Bhendval Ghatmadni 2023
बुलढाणा : राज्यभरातील शेतकरी भविष्यवाणीच्या प्रतिक्षेत असतात ती बुलढाणा जिल्ह्यातील घटमांडणी अक्षयतृतीयेला मांडली गेली होती. आज रविवारी पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी भविष्यवाणी वर्तविली गेली आहे. या भेंडवळ घटमांडणीला गेल्या 350 वर्षांची परंपरा असून ती आजही जोपासली जात आहे. या घट मांडणीतून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज घेतला जातो.
संपूर्ण शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ मांडणी 350 वर्षाची परंपरा कायम असून 23 एप्रिल ला जाहीर करण्यात आली मात्र शेतकऱ्यांच्या उपस्थितीत श्री पुंजाजी महाराज व श्री शारंगधर महाराज यांनी आज रविवारी घटमांडणी वर्तवली आहे यानुसार देशाचा राजा कायम असून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताण निर्माण होईल तसेच आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण राहील तर घुसखोरी,रोगराई वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात आली ,या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर ,उडीद, मूग ,हरभरा, जवस, तीळ, बाजरी, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी ,वाटाणा, मसूर ,आणि करडी असे अठरा प्रकारचे धान्य ठेवण्यात आले तर मध्यभागी चार मातीची ढेकले ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवन्यात आली घागरीवर पानसुपारी, पुरी ,पापड ,सांडोळी ,कुरडई ,भजे ,वडे हे खाद्यपदार्थ ठेवले गेले , रात्रभर या ठिकाणी कोणीही नागरिक जात नाही आणि आज रविवारी सकाळी या धान्याच्या झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून श्री सारंगधर महाराज व श्री पुंजाजी महाराज यांनी पिकाचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला.यावर्षी काय अंदाज वर्तविण्यात आला ते आपण जाणून घेवूया….
- Advertisement -
- Advertisement -
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ हे एक लहान गाव आहे. तेथे दरवर्षी ही घटमांडणी केली जात असते. पूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरु केली होती. त्यांना निळावंती नावाची विद्या अवगत होती. त्याआधारे ते ही भविष्यवाणी वर्तवित असत. त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. तपस्वी चंद्रभान महाराज यांनीसुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात.
अशी असते घटमांडणी
गावाबेरील शेतात एक वर्तुळ आखले जाते, त्या मधोमध खड्डा केला जातो. या खड्ड्यात मातीचा मडके (घट) ठेवतात. या घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य, अशा या ’घट मांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. ही भविष्यवाणी खरी ठरते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील अनेक शेतकरी दावा करतात.अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकर्यांची मोठी मान्यता असते आणि या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकर्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकर्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, अशी ही घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे. 350 वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे.
आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. मात्र येणार्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी यावर्षी शेतकर्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. हे अंदाज किती खरे ठरतात? यावर शंका असली आणि या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला, तरीही शेतकरी वर्ग मात्र यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात. शनिवारी मांडण्यात आलेल्या घट मांडणीचे आज पहाटे निरीक्षण करून खालील प्रमाणे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यावर्षी सुद्धा अक्षय तृतीयेला घट मांडणी करण्यात आली होती. आज सूर्योदयापूर्वी या घट मांडणीचे निरीक्षण करून खालील प्रमाणे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
असा राहील यावर्षी पाऊस
- जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल
- जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
- ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल
- सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल
- पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल
असा पीक पाण्याचा अंदाज
- यावर्षी पिकांवर रोगराई राहिल
- कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल
- ज्वारी सर्वसाधारण राहिल
- तूर पीक चांगले असेल
- मूग पीक सर्वसाधारण असेल
- उडीद मोघम सर्वसाधारण
- तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल
- बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल
- तांदुळाचं चांगलं पीक येईल
- गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल
- हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल
देशा संबंधीही केली भविष्यवाणी
- संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील
- देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल
राजा कायम राहील
- राजा कायम आहे, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल.
- राजकीय उलथापालथ होत राहिल
- नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त राहील
काय आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे?
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विश्वास ठेवतात. आपल्या वर्षभराचे शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात. मात्र ही घटमांडणी एक थोतांड असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. ऑन टाइम टुडे मीडिया सुद्धा अशा भाकितांच कोणतेही समर्थन करत नाही शेतकऱ्यांनी कृषीविषयक सल्ला घेऊनच पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे.