Weather update
पुणे : राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान असल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भोगांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान, पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. The Meteorological Department has warned of rain with lightning…
मध्य प्रदेश तसेच दक्षिण तामिळनाडू आणि परिसरावर देखील ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच मध्य प्रदेशपासून, महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूतील चक्राकार वाऱ्यांपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये ३३ मि.मी., तर लोहगावमध्ये ३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात अनेक भागात पाऊस झाला. धाराशिवमध्ये २ तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये २१, तर बीडमध्ये ५७ मि.मी. इतका जोरदार पाऊस पडला. विदर्भातील काही शहरांत पाऊस पडला आहे. अकोल्यामध्ये ३ मि.मी. तसेच बुलढाणामध्ये १२ मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
या जिल्ह्यात अलर्ट जारी
महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस जणू काही मुक्कामी आला आहे. पावसासह वीज पडण्याच्या घटना, गारपीट होत आहे. परिमाणी राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचेदेखील मोठे नुकसान केले होत असून जीवित आणि प्राण हानी होत आहे.अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मोठे नुकसान झाले आहे. आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या शहरांना पिवळा अलर्ट देण्यात आला आहे.विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
पावसाचा रेड, ऑरेंज, यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
समजून घ्या सोप्या शब्दात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची माहिती
हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी IMD कडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलोआणि रेड अशा रंगाचा वापर होतो.
रेड अलर्ट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकंच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण, यावेळी अनेक समस्या येऊ शकतात.
यलो अलर्ट म्हणजे काय?
हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलोअलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
शरीरसुखास पती नकार द्यायचा, नंतर तिला जे कळलं ते खूपच धक्कादायक होतं..
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती
एसटी महामंडळाची आता आणखी एक मोफत प्रवास योजना!
कसा घडतो सायबर क्राईम; वाचा या पाच घटना आणि अशी टाळा फसवणूक
बुलढाणा जिल्ह्यातील भेडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर