Gadchiroli Crime News
गडचिरोली : मृत माशांनी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडल्याची प्रकार गडचिरोलीतील मुलचेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. चारित्र्याच्या संशयापोटी पत्नीला विहिरीत ढकलून खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पत्नीला ढकलल्यानंतर विहिरीत तिचा तडफडून मृत्यू व्हावा, यासाठी पतीने वरून कीटकनाशक फवारले; पण महिलेसोबत माशांचा मृत्यू का झाला, या प्रश्नाने खुनाचा गुंता सोडवला. या खुनाचा गुंता पोलिसांनी मृत मासे पाहून कसा सोडविला वाचा सविस्तर …
अशी आली घटना उघडकीस
मुलचेरापासून पाच किलोमीटर अंतरावरील श्रीनगर गावात राहणाऱ्या महानंद मधुसूदन सरकार याने पत्नी खुशी (१९) ही ३० एप्रिलला बेपत्ता झाल्याची तक्रार मुलचेरा पोलीस ठाण्यात केली. दुसऱ्याच दिवशी त्याने शेतातल्या विहिरीत पत्नी मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तहसीलदारांसमक्ष खुशीला विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह विच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना मात्र विहिरीत मासे मृत कसे, असा प्रश्न पडला. विहिरीत खुशीसोबत सगळे मासे कसे दगावले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी चार पथके तयार केली. एक पथक गावात सरकारदाम्पत्याविषयी माहिती शोधत होते, दुसऱ्या पथकाने विहिरीचा परिसर तपासला. तिथे येणाऱ्या दर्पामुळे पोलिसांनी महानंदला चौकशीसाठी बोलावले. याच दरम्यान, ग्रामस्थांनी महानंद पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, अशी माहिती दिली. पोलिसांच्या चौकशीत त्याने पत्नीला विहिरीत ढकलल्याचे कबूल केले.
असा रचला कट
जवळपास चार महिन्यांपूर्वी चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर कृषी सोबत मूलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथील महानंद सरकार याचा विवाह झाला होता . महानंद हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच २९ एप्रिलला त्याने पत्नीचा दहा वाजता विहिरीजवळ खुशीला जाताना त्याने पाहिले. आसपास कुणी नसल्याचे पाहून त्याने तिला विहिरीत ढकलले.
विहिरीत टाकलं कीटकनाशक
विहिरीत खुशीला ढकल्यानंतर ती पुन्हा पायऱ्यांच्या मदतीने वर येऊ नये किंवा मदतीला कुणी जाईपर्यंत तिचा मृत्यू व्हावा, यासाठी त्याने मक्यावर फवारणी केले जाणारे हरबी साईट हे कीटकनाशक आणले. संपूर्ण विहिरीत त्याने कीटकनाशक फवारले. बुडणाऱ्या खुशीला कीटकनाशकाने वर येणे कठीण झाले. विहिरीतच तिचा मृत्यू झाला. कीटकनाशकामुळे खुशीचा हमखास मृत्यू होणार आणि तिच्या मृत्यूला आपण जबाबदार धरले जाणार नाही, या गैरसमजात महानंद होता; परंतु खुशीसोबत विहिरीतल्या माशांचा मृत्यू झाल्याने महानंदचा डाव त्याच्यावरच उलटला.
- Advertisement -
- Advertisement -
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
आनंद सागरमध्ये भक्तांना आता निशुल्क प्रवेश
शेतकऱ्याने केला चक्क कांद्याचा अंत्यविधी!
उपराजधानीत विदेशी तरुणींकडून देहव्यापार
शरीरसुखास पती नकार द्यायचा, नंतर तिला जे कळलं ते खूपच धक्कादायक होतं..
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती
एसटी महामंडळाची आता आणखी एक मोफत प्रवास योजना!