Monsoon Update
मुंबई: उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही एक दिलासा देणारी माहिती आहे. Monsoon Update नुसार आता राज्यात लवकरच पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. अगोदर मुंबईत आणि नंतर महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. राज्यात मान्सून किती तारखेला दाखल होईल, याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मान्सून आगमनाची आली तारीख समोर
Monsoon Update यावर्षी अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली आणि आता काही दिवसांपासून उष्णतेचा पारा वाढला असून तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे. अनेक शहर आणि जिल्हात अचानक वाढलेल्या तापमानामुळे जणू काही अंगाची लाही हिट आहे. सकाळी ९ वाजतपासूनच कडक उन्ह जाणवायला लागते.उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. या उकाड्यापासून दिलासा मिळवा म्ह्णून मान्सुनची वाट पाहिली जात आहे. यादरम्यान यंदाच्या मान्सून आगमनाची तारीख (Monsoon Update) समोर आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख (वेस्टर्न इंडिया) आणि शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला याबद्दल माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वतीने यंदा मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव होण्याची शक्यता 70 टक्के सांगण्यात आली होती. त्यामुळे मान्सूनचे आगमन कधी होणार याबाबत माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
कधी होणार मान्सूनचे आगमन ?
Monsoon Update महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन आणि त्याच्या वाटचालीबद्दल माहिती देताना कांबळे यांनी सांगितले की, या वर्षी एप्रिलमध्ये जारी केलेल्या हवामानाच्या दिर्घकालीन अंदाज म्हणजेच LRF (Long Range Forecast) नुसार महाराष्ट्रात 96% पर्यंत सामान्य मान्सून राहाणार आहे. याचा अर्थ असा की राज्यात सरासरी 87 मिमी पाऊस पडेल.तसेच त्यांनी सांगितलं की, सध्याच्या LRF नुसार 10 आणि 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होईल. तर मान्सून कसा प्रवास करेल आणि तो उत्तरेकडे केव्हा आणि कसा सरकेल, हे या महिन्याच्या अखेरीस कळेल असेही त्यांनी सांगितलं.यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पर्जन्यराजाचे आगमन होणार असल्याची बातमी हवामान विभागाने दिली आहे. यावर्षी सरासरी ९६ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी वृत्तसंस्थेला मान्सूनबाबत माहिती दिली. त्यानुसार मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
किती पडणार पाऊस
दिर्घकालीन अंदाजानुसार राज्यात ९६% पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.
परिस्थिती फार चिंताजनक नसेल
Monsoon Update यंदा कमी पावसामुळे राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते का? याबद्दल माहिती देताना हवामान विभागाकडून सांगण्यात आलं की, जेव्हा आम्ही LRF दिले तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यात 96% पर्यंत सामान्य मान्सून अनुभवेल. काही दुर्मिळ स्थितीमध्ये काही भागात कमी पावसाची शक्यता आहे.दरम्यान तरी देखील परिस्थिती फार चिंताजनक नसेल. कारण, संपूर्ण महाराष्ट्रात 90% पेक्षा जास्त सामान्य पावसाचा अंदाज आहे आणि काही ठिकाणी 30% पावसाची कमतरता असण्याची शक्यता आहे, जी फार जास्त नाही. तसेच योग्य शक्यता लक्षात याव्यात यासाठी आम्ही मे महिन्याच्या अखेरीस आमचा अंदाज पुन्हा अपडेट करत आहोत, तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितलं.
मे महिन्याच्या शेवटी नवा अंदाज
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयएमडीचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल नीनोच्या परिणामासंदर्भात बोलता येणार आहे. अल नीनो असणार आहे, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. परंतु आजवर 15 वेळा अल नीनो सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. अल नीनो चा मान्सूनशी 40% संबध गृहीत धरला जातो.
मान्सूचा प्रवास
१० ते ११ जून दरम्यान मुंबईत धडकणार
९६ टक्के सरासरी पावसाचा अंदाज
८७ मिमी सरासरी पाऊस होणार
पंजाब डख म्हणतात, ८ जूनला मृग नक्षत्राचे आगमन
Monsoon Update गेल्यावर्षापेक्षा यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये चांगला Monsoon चा पाऊस पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगत जून महिन्यात ८ जूनला मृग नक्षत्राचे आगमन होणार आहे; महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही. २२ जूनपासून सर्वत्र पाऊस पडणार आहे. २७, २८ जूनपासून शेतकरी सोयाबीन व इतर पीक पेरणी करतील, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली. यावर्षी जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्येसुद्धा भरपूर पाऊस पडणार आहे. यावेळी त्यांनी सन २०३५ पर्यंतचे पावसाचे अंदाजसुद्धा आहेत, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
Monsoon Update –हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी IMD कडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलोआणि रेड अशा रंगाचा वापर होतो.
रेड अलर्ट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकंच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण, यावेळी अनेक समस्या येऊ शकतात.
यलो अलर्ट म्हणजे काय?
हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलोअलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.
ग्रीन अलर्ट अलर्ट म्हणजे काय?
पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असेल. यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.
Monsoon Update असेच मिळविण्यासाठी तसेच आमची वेबसाईटला भेट देत रहा….
सविस्तर बातमी वाचा खालील लिंकवर (Monsoon Update)
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती