Weather update : आजच्या IMD अंदाजानुसार आणखी आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. राज्यातील तापमान (Maharashtra Temperature ) सतत वाढत असून सुरु आग ओकत असून तापमान चाळीशी पार राहत आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात तर एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेननंतर प्रशासन अलर्ट झाले असून नागरिकांनी पुढील आठवडाभर काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे. या बातमीत आपण हवामान विभागाने दिलेली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही बातमी आपण पूर्ण वाचाल…
तापमानात सात्यत्याने होतेय वाढ
उष्माघाताने एकाचा मृत्यू झाल्याने राज्यात उन्हाची तीव्रता किती वाढली आहे, याची जाणीव होते. अजून मान्सून दाखल व्हायला बराच कालावधी आहे. आणखी किती दिवस उन्हाचे चटके जाणवतील, असा प्रश्न आपणास पडला असेल तर त्याचे उत्तर या बातमीत मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नागरिकांना उन्हाची झळ बसू लागली आहे. राज्यातील ठाणे, जळगाव, नागपूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील पाच दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा दिला. या कालावधीत नागिरकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
सर्वाधिक तापमानाची नोंद कोठे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून कलाम तापमान ४० पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस या तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये बुधवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले. अमरावती आणि वर्ध्यात (४२.४ अंश सेल्सिअस) सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.
- Advertisement -
- Advertisement -
शेगावात उष्माघाताने एकाचा बळी
सध्या तापमानात चांगली वाढ झाली आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. शेगावमध्ये तर एकाचा बळी गेला आहे. आदेश भाऊराव शेगोकार (४९, रा. जोगलखेड, ता. बाळापूर, जि. अकोला) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अंतर्गत घटनेची नोंद केली आहे. सईबाई मोटे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खेताडे यांच्यातर्फे कक्षसेवक प्रभाकर घनोकार यांनी घटनेची फिर्याद दिली. त्यात उन्हामुळे व उपाशीपोटी असल्याने मृत्यू, असे कारण नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून लेखी ‘मेमो’ प्राप्त झाल्यावर पोलिसांनी मर्ग दाखल केला. यंदाच्या उन्हाळ्यातील उष्माघाताच्या बळीची ही विदर्भातील पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे घरातून बाहेर पडताना नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी तोंडाला स्कार्प, रुमाल बांधावे. टोपीचा वापर करावा. पाणी शुद्ध व जास्त प्रमाणात प्यावे. जेवण करताना ताक, दही याचा समावेश असावा. शरबत सारखे शितपेय प्यावे. उन्हामुळे त्रास जाणवू लागला तर रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.
वाचा मोठी बातमी ; महाराष्ट्रात या तारखेला मान्सून होणार दाखल !