Khamgaon News
खामगाव:- केंद्रातील मोदी सरकारने अदानी समुहाचे जवळपास 72 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केलेले आहे. मोठ-मोठे उद्योग रेल्वे स्टेशन, विमानतळ, विद्युत प्रकल्प यासारख्या अनेक संस्था अदानी समुहाला देण्याचे काम करुन मोदी सरकार निवडक उद्योग पतींवर मेहरबानी दाखवित आहे. अदानी समुहाने केलेल्या गैरकारभारामुळे एलआयसी व स्टेट बॅंक ऑफ इंडिया मधील पाॅलीसी धारक व गुंतवणुकधारांचे 33 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिंडनबर्ग संस्थेंच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फेचौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाच्या देखरेखीखाली चौकशी करावी तसेच गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे, अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे. अन्यथा काॅंग्रेसच्या वतीने वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन अधीक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ रोजी नांदुरा रोडवरील एलआयसी व स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.त्याप्रसंगी ते बोलत होते.
मोदी सरकारकडून देश कंगाल करण्याचा प्रयत्न
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवुन अदानी सोबत संगनमत करुन जनतेचा विश्वासघात केला आहे. ज्या गौतम अदानीला 2014 पुर्वी कुणी ओळखत नव्हते. त्या अदानी समुहाला मोदी सरकारचे राजकीय पाठबळ लाभल्यामुळे अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आला आहे. एलआयसी,स्टेट बॅंक ऑफ इंडिया हे आपल्या देशाचा गौरव आहे. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य नागरीकांच्या कष्टाचा पैसा गुंतलेला आहे. परंतू मोदी सरकारने अदानीच्या कंपनीमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे. अदानी समुहाने केलेल्या गैरकारभारामुळे सर्वसामान्यांचा हा पैसा धोक्यात सापडला आहे.जनतेचा पैसा बुडायला नको, सामान्य माणसाचा पैसा हा सुरक्षित राहावा यासाठी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी,प्रदेषाध्यक्ष नाना पटोले यांनी याविरुध्द सतत आवाज उठविलेला आहे. उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने देश कंगाल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्वांनी एकजुट होवुन हा प्रयत्न हाणुन पाडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
निदर्शने तसेच सरकारविरुध्द घोषणाबाजी
या आंदोलनामध्ये काॅंग्रेसजणांनी मोदी सरकारचा निषेध करणारे फलक हातामध्ये घेवुन निदर्शने तसेच सरकारविरुध्द बोंबा मारुन जोरदार घोषणाबाजी केली. अदानी समुहाच्या गैरभाराचे संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी झालीच पाहिजे, अदानी समुहातील आर्थिक गैरभाराची सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाच्या देखरेखीखाली चौकशी झालीच पाहिजे, गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळालेच पाहिजे,मोदी सरकार हाय-हाय, भाजपा सरकार हाय-हाय अशा घोषणा दिल्या. आंदोलनामध्ये खामगाव शहर काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने, खामगाव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, शेगाव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, खामगाव शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, कृ.उ.बा.स.चे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, माजी संचालक श्री कृष्ण टिकार, माजी पं.स.उपसभापती चैतन्य पाटील, माजी पं.स.सदस्य मनिष देशमुख, माक्ता-कोक्ताचे माजी सरपंच गणेश ताठे, काॅंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष बबलु पठान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या आंदोलनामध्ये वाडीचे ग्राम पंचायतचे सरपंच विनोद मिरगे, सुटाळा खुर्दचे सरपंच निलेश देशमुख, कदमापूरचे सरपंच पवन पवार, माजी नगरसेवक इब्राहिम खाॅ सुभान खाॅं, माजी नगरसेवक मो.नईम, शेख रशीद शेख उस्मान, राजु पटेल, अस्लम पटेल, गब्बरभाई, सुरेश बोरकर, आबीद उलहक, हाफीज साहेब,शेरु चैधरी, सतिष तिवारी, तानाजी नाईक, मोहन कोलते, तुशार राणा,गोपाल उज्जैनकार, षेशराव गोरे, अण्णाभाउ साठे सोशल फोरमचे युवा जिल्हा अध्यक्ष कृष्णा नाटेकर, विजय सारवान, महेंद्र भोजने, निवृत्ती धामनकार,मेहबुब खान,शेख अन्वर, केशव कापले, जसवंतसिंग शीख ,छोटु धामेलिया यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.