Dhule News
धुळे : आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सत्यजित तांबे (Satyajit Tambe) लागले कामाला लागले असून ५ जिल्ह्यात आभार दौरा त्यांनी सुरु केला आहे. दरम्यान विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निलंबनापूर्वी कुठलीही कारणे दाखवा नोटीस न देताच निलंबनाची कारवाई चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याची खंत नवनिर्वाचीत आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. गुरुवारी धुळे जिल्हा (Dhule District)दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी उमेदवारी केली. त्यात ते बहुमताने निवडून देखील जाते. त्यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात आभार दौरा सुरू केला आहे. आज ते धुळे जिल्हा दौन्यावर होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साथत्ता, शिक्षण क्षेत्रातील उपस्थित झालेले विविध प्रश्न शासन दरबारी आपण मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
२५ वर्षांचा शिक्षणाचा रोडमॅप
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोडविण्यासाठी ते मांडणार असल्याचे सांगत त्यांनी जनतेने आपले प्रश्न आपल्यापर्यंत मांडल्यास निखितच त्याबाबत शासनाला विचारणा केली जाईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला. अनेकं सुशिक्षीत तरुणाला उपलब्ध न नाही. घराघरात उच्चशिक्षीत तरुण असून येणाऱ्या काळात स्थानिक आमदार आणि खासदाराशी बेरोजगारी बाबत चर्चा करून रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत काम केले जाणार आहे. शिक्षक – भरतीबाबत अनेक समस्या असून शिक्षण मंत्री ना. दिपक केसरकर यांच्याकडे लवकरच बैठक घेवून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. एप्रिल अथवा मे महिन्यात नाशिक येथे तीन दिवशी शिक्षण परिषदेच आयोजन केले जाणार असून पुढील २५ वर्षांचा शिक्षणाचा रोडमॅप तयार केला जाणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळ घेतली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे देखील सहकार्य घेतले जाणार आहे.
१५ वर्षात एकही नवा प्रकल्प नाही
नाशिक जिल्ह्यातून समृध्दी महामार्ग गेला असून मेट्रोसारखे रेल्वे प्रकल्प देखील नव्याने येत आहेत. त्यामुळे उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. विद्यायांची शिष्यवृत्ती, अपग युनीट प्रकरण, अनुदानाचा प्रश्न यासह शिक्षण क्षेत्राशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशित राहाणार असल्याचे आ.सत्यजित तांबे यांनी सांगितले. दरम्यान आपण कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आपण अपक्ष निवडून आलो आहोत आणि अपक्षच राहणार असल्याचे यावेळी सांगितले. आ.तांबे यांनी कॉंग्रेसकडून करण्यात आलेल्या निलंबनाबाबत म्हणाले की, निलंबन करण्यापूर्वी कॉंग्रेसकडून कारणेदाखवा नोटीस पक्षाकडून मिळणे अपेक्षित होते. परंतु कुठलीही नोटीस न बजावताच निलंबनाची कारवाई चुकीच्या पध्दतीने करण्यात आली. गेल्या २२ वर्षांपासून राजकीय संघटनेत कार्यरत असून ५० पेक्षा अधिक गुन्हे काम करीत असतांना दाखल झाले आहेत. संघर्षातून आपण निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात उद्योग धंदे आणण्यासाठी सरकारची मानसिकता कमी पडत असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली असून उद्योग येत नाही तोपर्यंत रोजगार उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात १५ वर्षात एकही प्रकल्प नव्याने आले नसल्याचे देखील यावेळी सांगितले.