Pune Weather
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून वातावरण अचानक बदल झालेला आहे. आज ढगाळ वातावरण असून मंगळवारी काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं (Department of Meteorology) वर्तवली आहे. हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज (Weather Alert) वर्तविला असून शेतकऱ्यांसाठी तीन दिवस धोक्याचे असून नैसर्गिक आपत्तीमुळे होंणारे आपले टाळावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून वातावरण अचानक रंग बदलत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे विचित्र वातावरण फेब्रुवारीच्या महिन्यात होते. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुद्धा बरसला. आता राज्यात पुन्हा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात राज्याच्या अनेक भागांत पाऊस झाला. मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊन काही ठिकाणी गारपीट झाली. तर विदर्भातही नागपूरसह काही भागांत जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पाऊस थांबल. राज्याच्या दिशेने वारे वाहत आहेत. तसेच हिमालयीन भागात वादळ तयार होत आहे. परिणामी, यामुळे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. बुधवार, १५ ते शनिवार, १८ मा र्चदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या आहे. तर याच दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहण्याचेसेच गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढचे तीन ते पाच दिवस जोरदार पावसाचे संकेत आहेत. ही बाब लक्षात घेता हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर यावेळी वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. आताही खरीप आणि रब्बीची पिके शेतात उभी आहेत. तसेच पाजीपाला व फळशेती सुद्धा आहे. वादळी पाऊस आणि गारपीट यापासून पिकांचे नुकसान होणार नाही, याकरिता येत्या तीन दिवस शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होंणारे आपले टाळावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.