Anand Sagar Shegaon
शेगाव : श्री संत गजानन महाराज (shri sant Gajanan maharaj) यांचे समाधी स्थळ संतनगरी शेगाव (Shegaon) येथील आनंद सागर हा प्रकल्प महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आनंद सागर हा प्रकल्प पुन्हा सुरू होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. अखेर आनंद सागर सुरू करण्यात असल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
आनंद सागर हे शेगांव येथील मनोहारी उद्यान व ध्यान केंद्र आहे. हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे ३५० एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे. तीर्थाटन आणि पर्यटन असा योग जुळून आलेला असताना काही कारणाने आनंद सागर प्रकल्प बंद होता.
- Advertisement -
- Advertisement -
आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती संस्थानने अधिकृत दिली आहे.
संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्षापासून बंद होते. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत होते. २००१ साली धार्मिक,आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद निर्मिती करण्यात आली आहे.
आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत अहोते. दरम्यान आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
श्री संत गजानन महाराज संस्थानची माहिती खाली दिली आहे..
आनंदसागरमधील आध्यात्मिक केंदात प्रवेश सेवार्थ (निःशुल्क) राहील. वेळ: सकाळी १० ते सायं. ५ वा. पर्यंत सायं. ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल.शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते.
या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजीत अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आलीत.
श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर, आर्थिक घडी निट बसल्यावर तसेच आवश्यक सेवाधाऱ्यांची सेवा व पर्याप्त मुबलक पाणी उपलब्ध झालेवर आध्यात्मिक केंद्राची देखभाल-दुरुस्ती, काही भागाचे पुनर्निर्माण व पुढील विकास कार्ये हाती घेण्यात येतील.यासाठी बराच कालावधी लागणार आहे.तरी सर्वानी सहकार्य करावे, असे श्री संस्थानचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांनी सुचना फलकाद्वारे कळविले आहे.
आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती संस्थानने अधिकृत दिली आहे. संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्षापासून बंद होते. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत होते. २००१ साली धार्मिक, आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद निर्मिती करण्यात आली आहे. आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत अहोते. दरम्यान आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
लवकरच सर्व प्रकल्प सुरु होईल ?
आनंद सागर हा प्रकल्प पूर्ववत सुरु करावा अशी मागणी होत आहे. पूर्वी आनंद सागर मध्ये मनोरंजनासाठी विविध खेळणी होती. रेलगाडी, मत्सालय. फाउंटन, विविध खाद्यपदार्थ स्टोल तसेच बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे पर्यटकांचा पूर्ण दिवस कोठे निघून जात होता, हे कळत पण नव्हते. या सर्व सुविधा पुन्हा सुरु होतील, मात्र त्यास वेळ लागणार आहे. दरम्यान आनंद सागर पूर्ववत सुरु करण्यासाठी काम सुरु आहे.
आनंद सागर ला कसे याल?
संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा Anand Sagar हा एक आध्यात्मिक ध्यान केंद्र हा प्रकल्प आहे. आनंद सागरला भेट देण्यासाठी तुम्हाला शेगाव यावे लागेल. त्यासाठी तुम्ही राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे या साधनांचा वापर करू शकता. मुंबई, पुणे, भुसावळ, शिर्डी, नाशिक या सर्व रेल्वे स्थानकावरून शेगावसाठी ट्रेन आहेत. राष्ट्रीय महामार्ग ६, इतर सर्व मार्ग शेगावला जोडतात. समृद्धी महामार्ग सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातून गेला असल्याने या मार्गाने सुद्धा शेगावला येता येईल. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अचुक माहिती घ्या. त्यासाठी ऑनलाइन ॲपवर रेल्वे माहिती तसेच गुगल मॅप वर शेगावचा रूट पाहता येईल. St महामंडळ बस हा सुद्धा पर्याय आहे. Anand Sagar सकाळी 10 ला सुरू होते, दुपारी 4 वाजता प्रवेश बंद होतो.