Crop insurance issue
बुलडाणा : राज्यात पीक विमा ही शेतकऱ्यांची सरकारने चालवलेली एकप्रकारे थट्टा आहे. खाजगी कंपन्या गंडा देत असलयाने पीक विमा योजनेत शेतकरी वर्गाची मोठी अडवणूक केली जात आहे. याबाबत विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तरी सुद्धा या गंभीर प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका तरुण शेतकरी तसेच स्वाभिमानी शेटकारी संघटनेच्या कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेथे हजर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे.
पीक विमा प्रश्न ऐरणीवर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न उपविभागीय अधिकारी कार्यालय समोरील घटने नंतर बुलडाणा जिल्यात खळबळ उडाली आहे. संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या पिक विमा चा प्रश्न आता ऐरणीवर आला असून आज स्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरी अडगाव येथील रहिवासी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल टीकार यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकच धांदल
संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा छदामही मिळाला नाही त्यामुळे त्यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानुसार आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून अंगावर पेट्रोल सदृश्य द्रव्य टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली त्यांच्यावर शहर पोलिसांमध्ये विविध कलमाने गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. अमोल टीकार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची विश्वसनीय माहिती आहे माहिती आहे सदर प्रकारामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकच धांदल उडाली होती दरम्यान या घटनेची संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी चर्चा पसरली आहे.
प्रीमियम पेक्षाही विमा रक्कम कमी
यावेळी आंदोलक अमोल ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की , विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना जी विमा रक्कम मिळालेली आहे ती अत्यंत तोकडी आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंतही पीक विमा रक्कमेचे पैसे आलेले नाहीत तसेच पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तोकडी रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. त्यामुळे पिक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम द्या तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे फोटो विमा कंपनीचे साईडवर अपलोड केले. त्या शेतकऱ्यांनाही विमा रक्कम (क्लेम) मिळालेला नाही तर काही शेतकऱ्यांना प्रीमियम पेक्षाही विमा रक्कम कमी मिळालेली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
सरकारचीही फसवणूक केली
पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे देणे जीवावर आले असल्याने पिक विमा कंपनी पळ काढत आहेत, असा गंभाईर आरपो शेतकरी करत आहेत. पीक विमा कंपनीने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप होत आहे. जर पिक विमा कंपनीने घोटाळा केला नाही असे त्यांचे म्हणणे असेल , कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याचे फॉर्म व पिक विमा कंपन्यांनी केलेले पंचनामे पडताळावे आणि होवून जाऊद्या ‘ दूध का दूध , पाणी का पाणी पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचीच नाही तर सरकारचीही फसवणूक केली आहे . राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा प्रश्न मिटवावा , अन्यथा शेतकरी व पिक विमा कंपनीमध्ये संघर्ष पेटेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.