Cvigil app : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन अॅप विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या ह तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. यासाठी या लोकसभा मतदार संघात
आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक भारत आयोगाने सीव्हिजिल अॅप विकसित केले आहे. या मोबाइल अॅपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल अॅपवर तक्रार प्राप्त होताच तत्काळ त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. हा सीव्हिजिल अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे
उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त अॅप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. अॅपवर प्राप्त तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत.