Eknath Shinde resignation
मुबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप होईल, अशी चर्चा असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केलं आहे. गुजराती वर्तमानपत्रात आलेल्या बातमीचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजनीमा देण्याबाबत दिल्लीवरून सूचना केली गेली असल्याचं या ट्विट मध्ये नमूद आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून विविध वावड्या राजकीय वर्तुळात उठत आहेत. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा भाजपा सोबत जातील अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे सांगितले होते. आता पुन्हा नवीन चर्चा सुषमा अंधारे यांच्या ट्विट ने सुरु झाली असून मुंबईतील राजकीय हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात गुजरातमधील एका वृत्तबत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याचा दाखलाही अंधारे यांनी दिला आहे. दरम्यान, अंधारे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखीनच खळबळ उडाली आहे. दरम्यान सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दाखल झाले आहेत. मात्र मराठा आरक्षण याचिका फेटाळली असल्याने याबाबत बैठक आयोजित केली असून त्यासाठी मुख्यमंत्री यांनी मंत्री बोलावले असलयाचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतःच केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. हे सारे होत नाही तोच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, गुजरातमधील वृत्तपत्रात बातमी येते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली हेडक्वॉर्टरमधून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना आल्या आहेत. याचाच अर्थ असा की भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते असं दिसत आहे.
एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील का, अशी चर्चा हातात रंगू लागली असून सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, गुजरातच्या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात म्हटले आहे की, दिल्लीच्या हेटक्वार्टरमधून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, भाजप हे एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते, असेही अंधारे म्हणाल्या.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपान दौऱ्यावर होते. मात्र, हा दौरा अर्धवट सोडून नार्वेकर हे अचानक मुंबईत दाखल झाले आहेत. यासंदर्भात अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, राहुल नार्वेकर यांनी जपानहून परतण्याची स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. म्हणजेच, पडद्यामागे भाजपची बूमिका ठरलेली आहे. ती म्हणजे, एकनाथ शिंदेंना भाजप कधीही वाऱ्यावर सोडू शकते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
https://t.co/NoZO3mL5Tq
मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांना राजीनामा तयार ठेवण्याच्या सूचना अशी गुजराती वर्तमानपत्रातून बातमी आली. परंतु नेमकी बातमी काय असेल अनेकांना प्रश्न पडू शकतात. ही घ्या बातमी. @SaamanaOnline @ShivsenaUBTComm #मुख्यमंत्री_राजीनामा_द्या pic.twitter.com/7Fer4kWKeB
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 20, 2023
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवर गुन्हा दाखल करावा
खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांना आपला प्राण गमवाला लागला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवरही सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसेच संबंधित कंपनी ब्लॅकलिस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.