Health Tips:शरीराच्या वाढीसाठी तसेच स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी फळांचे सेवन केले पाहिजे हे आजवर आपण ऐकले असेल तसेच आहारतज्ञ् असो व डॉक्टर हे नेहमी फळे खाण्याचा सल्ला देत असतात. फळांमध्ये अनेक पोषक घटक हे असतात. मात्र हे सगळं असलं तरी याची दुसरी बाजी देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे. चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि अनेक शारीरिक समस्या चिंतेचे कारण बनू शकतात.
फळे आपल्या शरीराला हेल्दी ठेवतात मात्र त्यांचा अचूक टाईमिंग देखील तेवढाच महत्वाचा आहे. कारण चुकीच्या वेळी फळे खाल्याने त्याचे तोटे देखील आपल्याला सहन करावे लागतात. काही लोक नकळत रिकाम्या पोटी चुकीच्या फळांचे सेवन करतात आणि त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला त्या फळांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये.
केळी : अनेकजण वजन वाढीसाठी केळीचे सेवन करत असतात. मात्र याचे योग्य वेळेत सेवन करणे गरजेचे आहे. हे फळ रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो. तुम्हाला फुगल्यासारखे वाटू शकते. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही त्रासदायक ठरू शकते. यामुळे रिकाम्या पोटी केळीचे सेवन टाळावे.
संत्री आणि लिंबू: रिकाम्या पोटी लिंबू आणि संत्री यासारखी लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. या फळांच्या सेवनानं तुमचे पचन बिघडू शकते. रिकाम्या पोटी या फळांचे सेवन केल्यास सकाळी अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते.
- Advertisement -
- Advertisement -
किवी: किवी हे फळ अत्यंत पौष्टिक मानले जाते. किवी हे व्हिटॅमिन सी समृद्ध फळ आहे, त्यामुळे ते कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण त्यामुळे आंबट ढेकर येणे, आम्लपित्त आणि छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.
अननस : अनेकांना हे फळ खूप आवडते. याची विशिष्ट चव अनेकांना आवडत असल्याने हे फळ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. मात्र अननस देखील रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण त्यात फ्रक्टोज चांगल्या प्रमाणात असते. अननसात फायबरसोबत व्हिटॅमिन सी देखील असते. हे दोन्ही चयापचय मंदावतात.