Jawhar is a historical taluka of Maharashtra
सुनिल जाबर
जव्हार ( पालघर) सन २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने पालघर जिल्हा बनविण्यात आला;परंतु हा जिल्हा बनविण्यामागाचे कारण येथील आदिवासींना केंदस्थानी ठेवून त्यांचा विकास साधणे हे होते .निसर्ग सौंदर्याने नटलेल्या संस्थाकालीन जव्हारला जिल्हा दर्जा मिळणे आवश्यक होते परंतु या भागातील राजकीय उदासीनता आणि शासन प्रशासन समन्वयाचा अभाव या बाबी लक्षात घेता जव्हार जिल्हा होण्यापासून दूर लोटले गेले.त्यामुळे येथील ग्रामीण भागात विकास साधायचा झाल्यास जव्हार जिल्हा करून प्रशासकीय मुख्खालय या ठिकाणी देण्यात आल्यास या भागाचा होवू शकतो असे स्थानिकांचे आजची म्हणणे आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कोट्यवधी रुपये हे आदिवासींच्या विकासाकरिता दरवषी येत असतात.अनेक विभागवार या निधीची वाटणी केली जाते;परंतु गेली अनेक वर्षं अब्जावधी रुपये रुपये खर्च झाले तरी अजूनही या भागात पायाभूत सुविधा पुरविण्यात शासन प्रशासन फोल ठरत आहे त्यातच अधिकारी व कर्मचारी यांची अधुरी संख्या यामुळे येथील नागरिकांची कामे नियोजित वेळेत होत नसल्याची खंत आहे.
जव्हार व मोखाडा तालुक्यात ९०% आदिवासी लोकवस्ती आहे.डोंगरदऱ्यांच्या असलेल्या या परिसरात खरीप हंगामात शेती झाल्यानंतर आपल्या कुटुंबाची गुजराण व्हावी याकरिता शहर गाठणे,दोन पैसे जमा करून पुन्हा घरी येणे,दिनक्रमात पिढीजात सुरू स्थलांतर केल्याने विद्यार्थि शिक्षणापासून वंचित राहत आहेत.तसेच कुपोषण हा या भागात एक मोठा शाप बनत चालला आहे यावर उपाय म्हणजे जव्हारला विशेष दर्जा देवून जिल्हा बनवून येथील नागरिकांना न्याय देणे गरजेचे आहे.
- Advertisement -
- Advertisement -
जव्हारला ऐतिहासिक महत्व
जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण 70 कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर आहे. जव्हार शहरास एैतिहासिक वारसा लाभलेला असून जय विलास पॅलेस व शिरपामाळ व बोपदगड ही एैतिकासिक स्थळे आहेत. हनुमान पॉईंट-जव्हार, सनसेंट पॉईंट जव्हार, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, डोंबझरा ही पर्यटन स्थळे म्हणून ओळखली जातात. तसेच या तालुक्यात खंडोबा यात्रा जव्हार, विजयादशमी उत्सव जव्हार, शिवमंदिर यात्रा बाळकापरा व देवतळी यात्रा जामसर या ठिकाणी भरवली जातात. जव्हार तालुक्यामध्ये खंडेराव मंदिर जव्हार, हनुमान मंदिर जव्हार, राम मंदिर जव्हार, महादेव मंदिर जव्हार, अंबिका माता मंदिर जव्हार, शिवमंदिर बाळकापरा, राम मंदिर कडाचीमेट, विठठल मंदिर जव्हार, स्वामी समर्थ मंदिर जव्हार, शणी मंदिर जव्हार ही देवस्थाने आहेत. जगप्रसिध्द वारली पेटींग व देवदेवतांचे मुखवटे या तालुक्यातील रामखिंड या गावी तयार केले जातात.
” जव्हारला जिल्हा दर्जा मिळावा म्हणून अधिवेशनात मागणी केली असून येथील नागरिकांचे कामे होताना त्यांना कोणताही आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास न होता याच ठिकाणी मुख्खालय होण्याची मागणी केली आहे “.
–सुनिल भुसारा,आमदार विक्रमगड विधानसभा