Lack of tomato price: ‘टोमॅटो’ ला चांगला भाव मिळू लागला असताना केंद्र सरकारने अचानक एक निर्णय घेतला आणि आता ‘टोमॅटो’ दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान हा निर्णय भविष्यात शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.या बातमीत आपण टोमॅटो भाव का कमी झाले याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
नेपाळमधून आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव गेल्या ४ दिवसांत ५० टक्के कोसळले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प. पू. भगरीबाबा भाजीपाला आवारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी २३०० ते २५०० रुपये भाव मिळाला होता. शुक्रवारी हा भाव सरासरी ९०० ते ११०० रुपयांपावेतो घसरला. येत्या काळात दर आणखी कमी होण्याची भीतीमुळे टोमॅटो उत्पादक हादरले आहेत.
काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या मागणीत अचानक वाढ झाली. पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक समाधानकारक भाव मिळत असताना दुसरीकडे किरकोळ ५ ते ६ हजार क्रेट्सपर्यंत येत असल्याने आणि प्रतिक्रेट २३०० ते २५०० रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक आनंदात होते. एकीकडे शेतकऱ्यांना बाजारात टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब, कर्नाटक राज्यांसह पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने शुक्रवारी टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले गेल्या ४ ते ५ वर्षांनंतर टोमॅटोच्या बाजारभावात तेजी निर्माण झाल्याने उत्पादकांना अच्छे दिन आले असताना नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो मातीमोल भावाने विकण्याची वेळ येऊ शकते. तसे होऊ नये, यासाठी नाफेडमार्फत शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना फुकट वाटावा. आयात केल्या पेक्षा सरकारने टोमॅटो निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
शेगावात आता मौज, मस्ती धम्माल ; माऊली वॉटर पार्क १५ ऑगस्टपासून सुरू होतेय !