Nagpur News
नागपूर: समीरा फातिमा वल्द मुख्तार अहमद (४०, रा. भिलगाव) नावाच्या ‘लुटेरी दुल्हन’ने एक नाही, दोन नाही तर तब्बल ८ जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्न केल्यानंतर समीराने प्रत्येक पतीला, तिच्या कुटुंबातील सदस्याला प्रताडीत केले. त्यांच्यावर खोटे आरोप लावले. बदनामीची धमकी दिली. ब्लॅकमेलिंग करून रग्गड खंडणी वसूल केली. या सर्व
कटकारस्थानासाठी तिची आई रेहान जमाल, काका मौसीन अंसारी, मौसीन अंसारीची पत्नी, चालक हरीश, मित्र आणि बिझनेस पार्टनर वसीम तसेच डॉ. वसीम शेख यांनी तिला मदत केल्यामुळे तिच्यासह या ७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरातील एका बसचालकाची या ‘लुटेरी दुल्हन’ ने फसवणूक केल्यानंतर सर्व पिचर समोर आला. गुलाम गौस वल्द मोहम्मद इस्माईल पठाण
४९) असे पीडिताचे नाव आहे. पठाण यांची ‘लुटेरी दुल्हन’ सोबत फेसबुकवरून ओळख झाली. एकेदिवशी तिने पठाण यांना भेटायला बोलाविले आणि मनसर येथील एका हॉटलमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान, तिने त्यांच्यासोबत आक्षेपार्ह फोटो, व्हिडी ओही काढले. त्यानंतर दोघे आपापल्या
घरी निघून गेले. त्यानंतर ‘लुटेरी दुल्हन’ने पठाण यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हट्ट सुरू केला, पण पठाण यांनी प्रस्ताव धुडकावून लावला. एके दिवशी ती आणि तिचे ८ ते १० नातेवाईक पठाण यांच्या घरी आले आणि त्यांनी हॉटेलमधील आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ नातेवाइकांना दाखवून में समाजात बदनामी करण्याची, पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. शेवटी भीतीपोटी पठाण यांनी ‘लुटेरी दुल्हन ‘सोबत निकाह केला. त्यानंतर तिने प्रॉपर्टी लाटण्याचे प्रयत्न सुरू केले. पठाण यांनी बदनामी टाळण्याकरिता तिला ५० लाख रुपये दिले. दरम्यान, एके दिवशी ‘लुटेरी दुल्हन’ला पाचपावली पोलीस ठाण्यातून फोन आला. तिच्यासोबत पठाण पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा त्यांना तिचे अमानउल्ला नामक व्यक्तीशी लग्न झाल्याचे कळले. त्यांच्याशी तलाक न घेता निकाह केल्याचे लक्षात येताच पठाण यांनी पोलिसांना अधिक विचारपूस केली असता तिने यापूर्वी ७ निकाह केल्याचे आणि तिच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्याचे कळले. तिच्यावर पाचपावली, जरीपटका आणि मानकापूर पोलीस ठाण्यांतही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर पठाण यांनी गिट्टीखदान पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली.