Nana patole news
मुंबई : आगामी निवडणुका ईव्हीएमवर (evm) घ्याव्या की बॅलेट पेपरवर याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय(Supreme Court) घेईल. पण यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता जाणारच, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी ठाण्यात सोमवारी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार अत्यंत असंवदेनशील असल्याची टीकाही त्यांनी केली. अयोध्येतील महंतानी आम्हालाही निमंत्रण दिले असून आम्हीही अयोध्येत दर्शनाला जाणार आहोत, असेही नाना पटोले म्हणाले. सरकारच्या कारभाराने राज्याने मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सोमवारी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
‘जय भारत सत्याग्रह’
अदानी उद्योग समूहावर झालेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते, आता त्यांचा आवाज बंद करण्यासाठीच लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले. त्यांच्यावर झालेला अन्याय ‘जय भारत सत्याग्रह’ च्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरातील जनतेत पोहोचवा, असा ठराव प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेची सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे म्हणूनच ही मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा सूरही उमटला.
जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम
अदानींच्या कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपये आले कुठून, जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, अशी समिती स्थापन झालीच पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण म्हणाले. २००३ मध्ये शीतपेयांमधील कीटकनाशकांचे अंश सापडले होते, त्याची चौकशी करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखासी जेपीसीची स्थापना झाली होती. त्या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत, याची आठवण करुन देते, जेपीसीचे महत्त्व त्यांनी विशद केले. अदानी उद्योग समुहाच्या घोटाळय़ाची चौकशी करण्यासाठी जेपीसीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती उपयुक्त व प्रभावी ठरेल, अशी शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर राजकीय वादंग सुरु झाले आहे. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. या मुद्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका करीत, काँग्रेस पक्ष जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
- Advertisement -
- Advertisement -
ही बातमी वाचा … एकनाथ खडसे यांचा भाजपावर गंभीर आरोप
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहात पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार, खा. कुमार केतकर, विश्वजित कदम, हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, उल्हास पवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.