Weather forecast : राज्यात उन्हाचा चटका बसत असून, शुक्रवारी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे ४०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून, उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. काम नसल्यास दुपारी उन्हात फिरू न्याय, उष्मघातापासून स्वतःचा बचाव करावा असे, आवाहन करण्यात यहेत आहे.
झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मेघालयापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ आकाशझाल्याचे दिसून येत आहे. मात्र कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. आगामी दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमानात वाढ होत जाणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
कोकणातील काही जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक शहरांचे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून उन्हाचा चटका कायम राहणार आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यात शुक्रवारी पुणे येथे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस होते. अहमदनगर ३५.९, जळगाव ३९, कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर ३१.३, मालेगाव ४०.८, नाशिक ३६.९, सांगली ३६.८, सातारा ३७, सोलापूर ३८.६, मुंबई ३२, अलिबाग ३४.६, रत्नागिरी ३२.५, डहाणू ३३.४, छत्रपती संभाजीनगर ३७.६, परभणी ३८.८, नांदेड ३७.८, बीड ३८, अकोला ३९.८, अमरावती ३८.६, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ३८.२, चंद्रपूर ३८.६, गोंदिया ३५, नागपूर ३७.३, वाशीम ३९.६, वर्धा ३८.१, आणि यवतमाळ येथे ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले